वक्तृत्व
(कृपया पूर्वपरवानगी शिवाय ही पोस्ट मुद्रित किंवा प्रकाशित करू नये. नुकतीच लोकमान्य टिळकांची जयंती झाली. त्यावरून मला एक जुना किस्सा आठवला. मी शाळेत असतांना या काळात म्हणजे पावसाळ्यात वक्तृत्व स्पर्धा होत असत. टिळक जयंती ला तर हमखास या स्पर्धा असत. मी मुळात अत्यंत लाजरा, बुजरा. वर्गात कधी सरांनी एखादा प्रश्न विचारला तर उत्तर येत असूनही हात वर करायला घाबरायचो. आपलं काही चुकलं तर? मुलं हसली तर? अशी भीती कायम मनात असायची. एखाद्याची फजिती झाली कि वर्गातली टवाळ मुलं त्याला समजून घेण्याऐवजी कायम चिडवायची त्यामुळे अशी मानसिकता बऱ्याच मुलांची होत असते. क्वचित सरांनी एखाद्या प्रशांसाठी उभं केलंच, तर छातीत धडधड व्हायची. इकडे घरून आईचा मात्र वक्तृत्व स्पार्धेत भाग घे असा धोशा असायचा. धोशा काय, सक्तीचं असायची. मला वक्तृत्व हा प्रकार बिलकुल आवडायचा नाही. स्पर्धेत भाग घेणं नकोस व्हायचं. बक्षीस मिळण्याचा तर प्रश्नच नव्हता. चुकून मिळालं तर ते घेण्यासाठी स्टेज वर जावं लागेल आणि नक्की काहीतरी फजिती होईल आणि मुलं हसतील हा विचार डोक्यात बसलेला होता. आईच्या आग्रहाखातर संस्कृत आणि चित...