Posts

Showing posts from January, 2018

योगासन

'सलमान खान' किंवा 'जॉन अब्राहम' चा सिनेमा पाहून आलो की दुसऱ्या दिवशी पासून आम्ही व्यायाम सुरू करतो. त्यासाठी आम्ही लगेच  'जीम' मध्ये जाऊन एक वर्षांचे पैसे भरून टाकतो. मग 'ट्रॅक सूट, स्पोर्ट शूज, कॅलरी मोजणारे घड्याळ' असा जामानिमा करून आम्ही आरशासमोर डंबेल्स फिरवायला सुरुवात करतो. या काळात घरात काजू, बदाम असा खुराक असतो. हे वेड तब्बल 'सात ते आठ' दिवस टिकतं. नंतर मग सकाळी उठायला उशीर झाल्यानें त्यात खंड पडतो. सुटलेलं पोट एक 'नॅनो मीटर' ही कमी होत नाही आणि वजन काटा रोज वाढत्या बाजूनेच दिसल्याने आमचा भ्रमनिरास होतो. कोणीतरी आम्हाला सुचवतो 'वॉक' केल्याशिवाय पोट कमी होणार नाही, कोणती म्हणतं 'सायकलिंग' करा, कोणी सांगतं 'रात्री जेऊ नका' तर कोणी म्हणतं 'भरपूर खा, काही होत नाही' . विशेष म्हणजे असे सल्ले देणाऱ्यांची पोटं चांगलीच 'सुटलेली' असतात. महिनाभर लोकांनी सांगितलेलं सर्व काही आम्ही करून बघतो. वजन कमी झाल्यासारखं वाटायला लागतं. तेव्हड्यात एखादा मित्र म्हणतो "बारीक झाल्यासारखा वाटतोस रे तू?" त्य...

इंग्रजी नाव

सध्या खूप नवीन हॉटेल सुरू झालेली आहेत. पण त्यापैकी बहुसंख्य हॉटेल अवघड 'इंग्रजी' नावं देण्यात का धन्यता मानतात ते काही समजत नाही. आमच्या नासिक मध्ये तर इंग्लिश नावाचं पेव च फुटलंय.. भारतीय असल्याचा किती हा न्यूनगंड! बरं ही नावे लक्षात ठेवणे फार कठीण जाते. त्या नावात फार काही अर्थ असतो, असंही नाही.  बरेच वेळा त्या हॉटेलची सेवा आवडत असूनही वेळेवर नाव न आठवल्याने त्या हॉटेलचा संदर्भ दुसर्यास देता येत नाही.      एका इलेक्ट्रॉनिक वस्तू उत्पादन करणाऱ्या जपानी कंपनीस अनेक क्लिष्ट नावे सुचवण्यात आली. मात्र त्या कंपनीच्या प्रमुखाने नाव छोटे, सोपे असावे असा आग्रह धरला.. जगभरात कम्पनीचे नाव लोकप्रिय व्हावे असे वाटत असेल तर दर्जा सोबत नावही सहज उच्चरता येणारे हवे म्हणून त्या कंपनीने 'सोनी' हे नाव स्वीकारले. एकीकडे परदेशी मोबाईल कंपन्या भारतीय भाषांचे 'फॉन्ट' देऊन व्यावसायिकता दाखवत असताना भारतात व्यवसाय करणाऱ्या छोट्या हॉटेल चालकांचा अनेक उत्तम भारतीय नावं उपलब्ध असूनही  आपण इंग्रजांचे वंशज आहोत असे दाखवण्याचा अट्टाहास का? © मंगेश पंचाक्षरी, नासिक.

वड

© मंगेश पंचाक्षरी, नासिक.      आमचा प्रेमविवाह झाला. आजही आम्ही आमच्या बायकोच्या खूपच 'प्रेमात' आहोत. ती 'पुण्याची' आणि आम्ही 'नाशिकचे'. 'पुण्यापेक्षा मोठं आणि भारी शहर जगाच्या पाठीवर दुसरं कोणतंही नाही ' याबद्दल पुणेकरांना ठाम विश्वास असतो. त्यामुळं आमच्या सौ ना देखील 'पुण्याबद्दल' जबरदस्त प्रेम आहे. मी लग्नापूर्वी तिला भेटायला वारंवार पुण्यात जात असे. (आता आम्हा दोघांना एकमेकांत बोलायला फुकट फोन असूनही "आज गिळायला घरी येणार का बाहेरच हादडणार?" एवढाच काय तो संवाद होतो) त्यावेळी ती आम्हाला पुण्यातील एकेक महान ठिकाणं दाखवून 'तुमच्या 'नासिकला' असं काही आहे का ?' असं विचारून पुण्याचा जाज्वल्य अभिमान दाखवून देत असे . 'शनिवार वाडा, पर्वती,  युनिव्हर्सिटी, लक्ष्मी रोड' असं काहीकाही दाखवून ती आम्हाला चकित करत असे. एकदा तर तिने मला (माझ्याच पैशाने) मस्तानी खाऊ घालून "नाशिकमध्ये मस्तानी आहे का?" असं विचारल्यावर "मस्तानी नाही पण नाशिकमध्ये बाजीराव आहे" असं उत्तर देऊन आम्ही नासिककरांची चुणूक दाखवली हो...

राशीभाव

आम्ही ज्योतिषी आहोत पण तरीही ज्योतिष्यावर गाढ विश्वास ठेवणारे लोक आमची चांगलीच पंचाईत करतात हो. आता कालचीच गोष्ट घ्या. आमच्याकडे एक वृश्चिक राशीचा माणूस आला. आम्ही त्याची पत्रिका बारकाईने तपासून सांगितलं की तुझं सर्व काही छान आहे फक्त फालतू खर्च टाळा तर त्याने आमची दक्षिणाच दिली नाही! आमच्याकडे बायका नवऱ्याची पत्रिका घेऊन येतात. आम्ही अभ्यासून त्याना त्यांच्या नवऱ्याच्या भविष्याबद्दल सांगायला सुरुवात करतो तर त्या म्हणतात "भविष्य गेलं खड्यात. त्याचा भूतकाळ सांगा मग भविष्य मी ठरवते त्याचं!" काय काय नमुने बघत असतो आम्ही. वृषभ राशीच्या बायका सत्यनारायण च्या पूजेला स्लीवलेस घालून बसतात. त्या भटजींचं लक्ष लागत नाही हो पूजेत. सिंह राशीचा माणूस कधीच वेटर होत नाही कारण त्याला 'ऑर्डर' घ्यायची सवय नसते.  एकदा आमच्या दारावरची बेल बिघडली म्हणून आम्ही 'मीन' राशीच्या इलेक्टिशियन ला निरोप देऊन आलो. पाच दिवस झाले तरी पठ्ठा आलाच नाही. शेवटी आम्ही फोन केला तर म्हणतो " मी तीन वेळा येऊन गेलो साहेब, कितीवेळ बेल वाजवली, कोणी दारच उघडलं नाही. राशी लोकांच्या चालण्यातूनही समजतात...

पेट्रोल पंप

आमच्या 'सौ' स्कुटर फिरव फिरव फिरवतात आणि पेट्रोल संपलं की "चला ना कुठं तरी आपण दोघेच, छान स्कुटर वर फिरून येऊ" असं लाडीकपणे म्हणतात. आम्हीही खुश होऊन निघतो आणि मग त्या हळूच म्हणतात "आधी पेट्रोल भरून घेऊ". आमच्या 'भोळ्या' स्वभावामुळे आम्ही नेहमीच या प्रेमळ आग्रहाला बळी पडत आलेलो आहोत.  मला दुपारच्या जेवणास उशीर झाल्यास सौ फोन करते "अहो, किती उशीर? आधी जेवण करा आणि मग तुमची कामं करा बघू!" आम्हाला सौ चं हे काळजी घेणं 'जाम' आवडायचं हो. पण नंतर समजलं की 'भांडेवाली' अडीच वाजता येते आणि त्याच्या आत आम्ही जेवलो नाही तर सौ ना स्वतः 'भांडे घासून' घ्यावे लागतात म्हणून हा आटापिटा चालायचा. त्यातून ते भाज्या वगैरे 'एका भांड्यातून दुसऱ्या भांड्यात काढून का ठेवतात' हे कोडे काही आम्हाला उलगडलेले नाही. तसेच स्कुटर मध्ये पेट्रोल भरणे काही आमच्या सौ ना जमत नसे म्हणून हा सर्व 'ड्रामा' असायचा. मग आम्ही सौ ना पेट्रोल भरणे शिकवले. दोनशे रुपये चे पेट्रोल भरून दाखवले. आमच्या सौ तशा फार हुशार आहेत. त्यांनी दोनशेचं पेट्रोल भरल्...
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.      लहान मुलं भविष्य काळ रंगवण्यात दंग असतात. त्यांना असं झालेलं असतं की कधी एकदा मी मोठा होतो. मी मोठा झालो की माझ्या मनाप्रमाणे वागणार. आवडेल ते खाणार, गाडी चालवणार असं सतत भविष्यकाळाबद्दलच स्वप्न ते बघत असतात. तरुण लोकं वर्तमानात जगत असतात. आजचा दिवस जगून घ्या, उद्या कोणी पाहिलाय असं त्यांचं मत असतं. नवनवीन प्रयोग करून बघण्याचा उत्साह असतो. आपल्याला कधी म्हातारपण येणार आहे अशी कल्पनाच ते करत नसतात. म्हातारी माणसं भूतकाळात रमत असतात. गतकाळातील वैभवशाली क्षणांच्या आठवणी ते भेटेल त्याला ऐकवत असतात किंवा त्यात रममाण होत असतात.      लहानपणी देहाबद्दल फारसं समजत नसतं पण तरुणपणी मात्र शरीराचे चोचले पुरवण्याबद्दल जबरदस्त आसक्ती असते. भौतिक सुखाच्या मागे तरुणपण आपल्याला पळवत असते. पैसा, सत्ता, यश, कुरघोड्या, मत्सर याभोवती हा काळ फिरवत ठेवतो. धावपळ, प्रवास, पार्ट्या, ताण तणाव झेलण्याची ताकद या काळात शरीरात असते. हे जग सुंदर वाटत असते आणि हा जीवनप्रवास कधी संपूच नये असं वाटत राहतं. जीवनाबद्दल कमालीची आसक्ती निर्माण होते. पण निसर्गाने...
© मंगेश पंचाक्षरी, नासिक.      लहान मुलं भविष्य काळ रंगवण्यात दंग असतात. त्यांना असं झालेलं असतं की कधी एकदा मी मोठा होतो. मी मोठा झालो की माझ्या मनाप्रमाणे वागणार. आवडेल ते खाणार, गाडी चालवणार असं सतत भविष्यकाळाबद्दलच स्वप्न ते बघत असतात. तरुण लोकं वर्तमानात जगत असतात. आजचा दिवस जगून घ्या, उद्या कोणी पाहिलाय असं त्यांचं मत असतं. नवनवीन प्रयोग करून बघण्याचा उत्साह असतो. आपल्याला कधी म्हातारपण येणार आहे अशी कल्पनाच ते करत नसतात. म्हातारी माणसं भूतकाळात रमत असतात. गतकाळातील वैभवशाली क्षणांच्या आठवणी ते भेटेल त्याला ऐकवत असतात किंवा त्यात रममाण होत असतात.      लहानपणी देहाबद्दल फारसं समजत नसतं पण तरुणपणी मात्र शरीराचे चोचले पुरवण्याबद्दल जबरदस्त आसक्ती असते. भौतिक सुखाच्या मागे तरुणपण आपल्याला पळवत असते. पैसा, सत्ता, यश, कुरघोड्या, मत्सर याभोवती हा काळ फिरवत ठेवतो. धावपळ, प्रवास, पार्ट्या, ताण तणाव झेलण्याची ताकद या काळात शरीरात असते. हे जग सुंदर वाटत असते आणि हा जीवनप्रवास कधी संपूच नये असं वाटत राहतं. जीवनाबद्दल कमालीची आसक्ती निर्माण होते. पण निसर्गाने...
एका बँकेत आमचे कर्ज होते.  त्या शाखेत एक नवीन शाखाधिकारी आले होते. त्यांची आणि माझी ओळख नव्हती. मी कामानिमित्त बाहेर गावी होतो. मी त्यांना भेटायला गेलो नव्हतो याचा त्यांना बहुदा राग असावा. त्यांनी माझ्या घरी फोन केला आणि कर्जासबंधी सौ ला माहिती विचारून फैलावर घेतले. मी नाशिकला आल्यावर सौ ने आम्हाला फैलावर घेतले आणि ताबडतोब त्या शाखाधिकाऱ्याची बदली करा असे आम्हाला फर्मान सोडले. आमच्या सौ ना असे आदेश देण्याची सवय आहे. पण आमच्या सांगण्यावर बदली होणार कशी? मग आम्ही त्या बँकेच्या चेअरमन साहेबांकडे गेलो. त्यांनी आमच्यासाठी चहा मागवला. आम्ही चहा पिताना त्या शाखाधिकाऱ्याची वारेमाप स्तुती केली. वेळप्रसंगी ते साहेब आम्हांला नियमाच्या बाहेर जाऊन मदत करतात असंही सांगून इतका चांगला माणूस त्या शाखेत दिल्याबद्दल आभार मानले. आमच्या या कमेंटवर चेअरमन साहेब चहा पिता पिता काही क्षण थांबले. आम्ही समजलो की आमचे काम झाले. चेअरमन साहेबानी "बँक तुमच्या सेवेसाठीच आहे वगैरे वाक्य आमच्या तोंडावर फेकली". प्रत्यक्षात त्या शाखाधिकाऱ्याची दोन दिवसात बदली झाली. कधी कधी तक्रार करण्याऐवजी अति स्तुती करूनही क...